• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

चटकदार पदार्थ विकणाऱ्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; FDAकडून धक्कादायक खुलासा

मुंबई आणि उपनगरांत साठ टक्क्यांहून अधिक विक्रेते विनापरवानाच अशा अन्नपदार्थांची विक्री करतात, असे आढळून आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 5, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : खाऊगल्लीमध्ये पाणीपुरी, चाटच्या गाड्या, चायनीज भेळ, तवा पुलाव, व्हेज फ्रँकी, शोरमापासून आईस्क्रीमपर्यंत असंख्य गोष्टी गाड्यांवर मिळतात. वडापाव तर गल्लोगल्ली खायला मिळतो. या सर्वच पदार्थांची विक्री करण्यासाठीही अन्न व औषध प्रशासनाकडून अधिकृत परवान्याची गरज लागते. मात्र मुंबई आणि उपनगरांत साठ टक्क्यांहून अधिक विक्रेते विनापरवानाच अशा अन्नपदार्थांची विक्री करतात, असे आढळून आले आहे. चटकदार, चवदार पदार्थांसाठी या गाड्यांवरील पदार्थांवर ताव मारणाऱ्या मुंबईकरांनी आपण जिथे खात आहोत, त्या विक्रेत्याकडे योग्य परवाना आहे का, याची विचारणा करू शकतो. परंतू अनेकदा तसे केले जात नाही. त्यामुळे चायनीज भेळ किंवा मोमोची चटणी यात घातलेले रंग, फ्रीजमध्ये कित्येक दिवस साठवून ठेवलेले तसेच आंबवलेले पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जातात. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेली आजारांची माहिती पाहिली तर मागील काही महिन्यांमध्ये डेंग्यू, मलेरिया या आजारांसोबत गॅस्ट्रोच्या आजाराचा त्रास वाढला आहे. दूषित पाण्यासह दूषित अन्नपदार्थांमधूनही हा त्रास रुग्णांना होतो. केवळ पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांची तपासणी करण्यासह अन्य मार्गाने होणारा संसर्गही यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे हॉटेल्सच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी अन्नपदार्थांची, पाण्याची खुली विक्री होते तिथे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी जातात का, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

एफडीएतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न औषध अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहे. त्यामुळे पूर्ण मुंबईचा भार हा पंधरा ते वीस अधिकाऱ्यांवर येतो. सरकारने रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेसाठी अंशतः मान्यता दिली आहे. मात्र अद्याप या जागा भरण्यात आलेल्या नाही. योग्यवेळी रिक्त पदे भरली तर त्याचा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एफडीए व्यावसायिक उद्देशाने अन्नपदार्थ तयार करून त्याची विक्री केली जात असेल तर त्यासाठी अधिकृत परवान्याची गरज असते. मुंबईमध्ये एफडीएने केलेल्या कारवाईमध्ये ढाबे, हॉटेल्स, ओपन फूड किचन यांच्याकडे अशा परवान्यांची उपलब्धता नसल्याचे दिसून आल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले होते. परवाने घेतल्यानंतर संबधित व्यक्तीला आपण अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन करणाऱ्या ठिकाणी आहार घेत आहोत, येथे वापरात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता, कच्च्या मालाची गुणवत्ता चांगली आहे याची खात्री पटते, याकडेही एफडीएने लक्ष वेधले.

रस्त्यावर गाड्यावर मिळणारे आईस्क्रीम, कुल्फीच्या गाड्या, मटका कुल्फी यामध्ये ज्या बर्फाचा वापर केला जातो. त्यातले पाणी कुठले असते याचा शोध घेतला जात नाही. विविध प्रकारच्या ज्युसमध्ये वा उसाच्या रसामध्ये वापरण्यात येणारा हा बर्फ आरोग्यासाठी अपायकारक असतो. दोन वर्षांपूर्वी विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरात येणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेची तपासणी होईल, असे फर्मान अन्न व औषध प्रशासनाकडून काढण्यात आले होते, त्याचे पुढे काय झाले असा प्रश्न आरोग्य कार्यकर्ते सुमेध पाटील यांनी उपस्थित केला आहे. विविध प्रकारच्या व विशिष्ट कंपनीच्या नामसदृश बाटलीबंद पाण्याची बाजारामध्ये विक्री होत असते. त्यांच्या किंमतीही वेगवेगळ्या असतात. या पाण्याची शुद्धीकरणाची प्रक्रिया कशी असावी, याची पद्धत ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्डने ठरवून दिलेली आहे. त्यानुसार निर्जतुक बाटल्यांमध्ये वा पाकिटांमध्ये पाणी पॅकबंद केले जाते. पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी हे पाणी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणे, अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र अशा चाचण्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याही होत नाही.

Previous Post

रस्त्यावर फुलांचा कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

Next Post

‘यंग इंडिया अनच्नेड’ उपक्रमातून महिलांविषयक गुन्हेगारीला बसेल प्रतिबंध – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘यंग इंडिया अनच्नेड’ उपक्रमातून महिलांविषयक गुन्हेगारीला बसेल प्रतिबंध - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION