मुंबई : गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शाळांना २ सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी शाळा भरल्या आहेत. शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने शाळा पुन्हा बंद असतील. त्यातच शुक्रवारी ईद-ए-मिलाद असल्याने शाळांना सुट्टी असेल की नाही याबाबत काही पालकांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित्ता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये शाळा बंद राहणार आहेत.
५ आणि ६ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलाद साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये शाळा बंद राहणार आहेत. ही सार्वजनिक सुट्टी असून, राष्ट्रीय सुट्टी नाही. ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणूनही साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यातील शाळांचा सुट्ट्यांमध्ये ईदनंतरचा शुक्रवार, घटस्थापना, महाराजा हरि सिंह यांची जयंती आणि दुर्गा पूजा यांचा समावेश आहे. ईद-ए-मिलाद, ज्याला पैगंबर मोहम्मद यांची जयंती म्हणूनही ओळखले जाते, ५ आणि ६ सप्टेंबरला साजरी केली जाईल. यानिमित्ताने दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील शाळा बंद राहण्याची अपेक्षा आहे.







