• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

संपूर्ण स्वच्छता मोहीम ही फक्त मोहीम नसून लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 8, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत आहे. यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. ही फक्त एक मोहीम नसून हे जनतेचं अभियान आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच स्वच्छतेचे हे अभियान लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहिमेला नेपियन सी रोड, प्रियदर्शनी पार्क येथून सुरुवात होऊन नरिमन पॉईंट, एनसीपीए, कर्नक बंदर या ठिकाणी ही मोहिम राबवून शिवडी-न्हावा शेवा (एमटीएचएल), कोस्टल रोड या प्रकल्पांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सुधाकर शिंदे, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता श्री. स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विकसित भारत अभियान ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. स्वच्छ भारत अभियान हे २०१५ ला सुरु करण्यात आले. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन हे अभियान राबविण्यास सुरूवात केली. तेव्हा खऱ्या अर्थाने या अभियानाला चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सिडको, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत.

मुंबई महानगर (एमएमआर) क्षेत्रात मीराभाईंदर, भिवंडी, पनवेल, ठाणे, डोंबिवली, कल्याण या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. हळुहळू आपल्याला ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवायची आहे. यासाठी अद्ययावत अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असून मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी संपूर्ण स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. आज ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे, त्याठिकाणी नेमून दिलेल्या यंत्रणेने तीन किलो मीटरपर्यंतचे आपले काम पूर्ण करावे तसेच सकाळी मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळी लवकर येऊन स्वच्छता केली पाहिजे, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या आडचणी आहेत त्या सोडविण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांना पंचतारांकित सुविधा देण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या मोहिमेत खरे हिरो हे सफाई कर्मचारी असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू (एमटीएचएल) हा समुद्रावरील देशातील सर्वाधिक लांबीचा असा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दळणवळणासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. हा पर्यावरणपूरक असा प्रकल्प आहे. हा पूल बांधण्यासाठी चांगल्या दर्जाचे साधन सामग्री वापरण्यात आले आहे. याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. याचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या मार्गावरील टोलची सुविधाही अत्यंत माफक दरात म्हणजेच २५० रुपयात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई गोवा, पुणे, नवी मुंबईशी कन्क्टेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे नवी मुंबई एरपोर्टलाही जोडले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करताना ध्वनिप्रदूषण होणार नाही तसेच फ्लेमिंगोचे जीवन, खारफुटीला धोका होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक साधनसामग्रीचा वापर करून या प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील होणारी वाहतूक कोंडी सुटणार, प्रदूषण कमी होणार आहे तसेच वेळ व इंधनाची पर्यायाने आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे.

शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर असे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे मुंबई शहरातील हवेतील प्रदुषणाचा इन्डेक्स ३५० होता तो आता १०० वर आला ही चांगली बाब आहे. यामुळे पवईमध्ये ८० बोरीवली ९० असे प्रमाण झाले आहे. बांद्रा, बीकेसी आणि ठाणे अशा ठिकाणी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. मुंबईतील विविध ठिकाणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मॉर्निंगवॉक करणाऱ्या नागरिकांशी स्वच्छता अभियानाविषयी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्र्यांनी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग, भिंती पाण्याने साफ केल्या. स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती, कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते. हातात पाण्याचा पाईप व झाडू घेऊन स्वत: मुख्यमंत्री स्वच्छता करीत असल्याचे पाहून अधिकारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती.

Previous Post

व्हीआयपी क्रमांकामुळे पुणे आरटीओ मालामाल; वाहनांच्या व्हीआयपी क्रमांकासाठी पुणेकरांनी मोजले तब्बल ४७ कोटी रुपये

Next Post

बोरिवली एलोरा गेस्ट हाऊसमधून एटीएसकडून ६ जणांना शस्त्रांसह अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बोरिवली एलोरा गेस्ट हाऊसमधून एटीएसकडून ६ जणांना शस्त्रांसह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION