मुंबई : मुंबई एटीएसची मोठी कारवाई केली आहे. मुंबई एटीएसने बोरिवली पूर्व एलोरा गेस्ट हाऊसमधून ६ जणांना अटक केली आहे. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र देखील हस्तगत करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. मोठ्या प्रमाणाच शस्त्र कशासाठी आणली होती? कोणता घातपाताचा कट तर नव्हता ना? याचा पोलिस तपास करत आहेत.
मुंबई एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने ताब्यात घेतलेले ६ आरोपी दिल्लीहून मुंबईत आले होते. हे आरोपी मुंबईत काही मोठा गुन्हा करण्यासाठी आले होते की कुणाला शस्त्र पुरवण्यासाठी आले होते, याचा तपास मुंबई एटीएस आणि कस्तुरबा पोलीस करत आहेत.