मुंबई : आवाज मराठीचा म्हणत राज ठाकरे व उद्धव ठाकरे बंधूंनी वरळी डोम येथे बोलावलेल्या मराठी माणसाने वरळी गावातील आस्तिक ब्रास ब्रँड पथकाच्या संगीतावर एकच जल्लोष केला. राज्य सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द केल्यानंतर ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाने आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला सर्व पक्षीय मराठी माणसाने प्रचंड गर्दी केली.वरळी डोम बैठकची क्षमता आठ हजार श्रोत्यांची आहे मात्र या कार्यक्रमाला त्याहीपेक्षा चार पाच हजार कार्यकर्त्यांची गर्दी सभागृह बाहेर होती. मुख्य कार्यक्रम सुरू होण्या अगोदर वरळी गावातील ब्रास ब्रँडने कार्यक्रमात जाण आणली.
विविध स्तरातून विरोध वाढल्यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठीच्या विजयी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वरळीतील एनएससीआय डोम येथे हा मेळावा होत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी व सदस्य, मराठी कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी ‘एनएससीआय डोम हाऊसफुल्ल’ झाले आहे. त्यामुळे आता डोमचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. परिणामी राज आणि उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी हुकल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र डोममध्ये प्रवेश करू न शकलेल्या नागरिकांना डोमबाहेर मोठ्या एलईडी स्क्रीनवर मेळावा पाहण्याची व्यवस्था केली आहे. राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय व सामाजिक वातावरण पेटलेले पाहायला मिळाले. त्यानंतर विविध स्तरातून विरोध वाढल्यानंतर त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मराठीच्या विजयी मेळाव्याचे वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजन करण्यात आले आहे.





