मुंबई : परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी एक मे पासून वाहन परवाना काढताना जुजबी का होईना मराठी हे बोलावे लागेल मराठी बोलता आले नाही तर प्रसाद (मार) खायला तयार राहा, असा इशारा शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिला. राज्याचे परिवहन मंत्री अरुण प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी टॅक्सी व रिक्षा चालक यांनी नवीन परवाना घेताना किंवा नूतनीकरण करताना चालकाला जुजबी का होईना मराठी आलं पाहिजे असे मत मांडले होते. यावर शिवसेना शिंदे पक्षाचे प्रवक्ते सावंत यांनी सहमती दर्शवली आहे.
एक मे नंतर राज्यातील प्रत्येक परप्रांतीय रिक्षाचालक अथवा टॅक्सी चालक यांनी नवीन परवाना घेताना अथवा जुना परवाना नूतनीकरण करताना अस्खलित का होईना मराठी हे बोललंच पाहिजे असे मत मांडले हे मत मांडताना त्यांनी सरनाईक यांच्या निर्णयाची प्रशंसा केली. परराज्यातून पोटापाण्यासाठी राज्यात येणाऱ्या चालकांचे शिवसेना शिंदे पक्ष हे स्वागतच करते पण त्यांना येथील बोलीभाषा मराठी बोलता आली पाहिजे असे सावंत म्हणाले .समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते अबू आजमी यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. हा विरोध त्यांचा चुकीचा असून परप्रांतीयांना रोजगार पासून दूर ठेवणार आहे. परप्रांतीयांना जुजबी मराठी आल्यास त्यांच्या व्यवसायासाठी तो फायदाच होणार आहे. आज मी यांच्या अशा भूमिकेमुळे यापूर्वी त्यांनी प्रसाद लाड आणि रमेश वांजळे या आमदाराकडून त्यावेळी भर विधानसभेत मार खाल्ला होता. त्याचे आठवणी सावंत यांनी करून दिली. परप्रांतीय चालक जर जुजबी मराठी बोलू शकले नाही तर त्यांनी प्रसाद खाण्याची तयारी ठेवावी असे ही सावंत म्हणाले. त्यामुळे राज्यात पुन्हा मराठी अमराठी वाद उफाळून येणार आहे.







