मुंबई : पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या आठ महिन्यात २. ९४ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ११५ कोटी रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ३० कोटी ६ लाखांचा दंडाचा समावेश आहे. विशेष म्हणजे साध्या लोकलच्या तुलनेत एसी लोकलमध्ये विना तिकिट प्रवाशांची संख्या ६८ टक्यांनी वाढली आहे. मुंबईच्या लोकल मध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशी वाढत असल्याने रेल्वे विभागासाठी मोठी डोके दुखी ठरत होती. मात्र आता लोकलच्या फुकट्या प्रवाशांना मुसक्या आवरण्यासाठी पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते.
पश्चिम रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्याच्या कालावधीत २ लाख ९४ हजार विना तिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे, ज्यामधून ११५ कोटी ७१ लाख रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर ३० कोटी ६ लाखांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून आकारण्यात आला. उपनगरीय रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, वेळेची बचत करण्यासाठी, गडबड आहे अशा विविध कारणांमुळे प्रवासी तिकिट न काढता लोकलने प्रवास करतात. अशा प्रवाशांवर रेल्वेचे तिकिट तपासनीस दंडात्मक कारवाई पश्चिम रेल्वेने हाती घेतली आहे. त्यामुळे एकट्या नोव्हेंबर महिन्यात उपनगरीय रेल्वे मार्गावर ९४ हजार विना तिकिट प्रवाशांकडून ५ कोटी ६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. एसी लोकलमध्ये ४४ हजारांपेक्षा जास्त अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला .या प्रवाशांकडून १४३ .४३ लाखांचा दंड जमा करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा दंड ६८ टक्यांनी जास्त आहे.