• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात धर्मांतरासाठी कडक नियम उल्लघन केल्यास तुरुंगवास आणि दंड

admin by admin
March 16, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
महाराष्ट्रात धर्मांतरासाठी कडक नियम उल्लघन केल्यास तुरुंगवास आणि दंड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्रात धार्मिक परिवर्तनासंदर्भात महत्त्वाचे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 नावाचे हे विधेयक शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आले. या विधेयकातील काही तरतुदींमुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे. या विधेयकातील सर्वाधिक चर्चेत असलेली तरतूद म्हणजे “बेकायदेशीर धार्मिक परिवर्तनामुळे झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म”. विधेयकानुसार, अशा विवाहातून जन्मलेल्या मुलाला आईने विवाहापूर्वी जो धर्म स्वीकारला असेल, तोच धर्म त्याचा असेल. विधेयकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, “बेकायदेशीर धर्मांतरामुळे झालेल्या विवाह किंवा विवाहासारख्या नात्यातून जन्मलेले मूल हे त्या नात्यापूर्वी आईचा जो धर्म होता, त्याच धर्माचे मानले जाईल.” ही तरतूद इतर अनेक राज्यांमधील धर्मांतरविरोधी कायद्यांपेक्षा वेगळी असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र सरकारने असा दावा केला आहे की, राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आणण्यात आले आहे.

यापूर्वी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीत पोलिस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता आणि त्यांनी अशा प्रकारचा कायदा करण्याची शिफारस केली होती. या विधेयकानुसार धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना किमान ६० दिवस आधी लेखी नोटीस द्यावी लागेल. धर्मांतर झाल्यानंतरही संबंधित व्यक्ती आणि धर्मांतराची प्रक्रिया पार पाडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला ६० दिवसांच्या आत प्रशासनाकडे घोषणा पत्र सादर करणे बंधनकारक असेल. धर्मांतर प्रक्रियेत जबरदस्ती, फसवणूक, चुकीची माहिती, दबाव किंवा प्रलोभन दिल्यास ते “बेकायदेशीर धर्मांतर” मानले जाईल. तसेच लग्नाच्या आमिषाने किंवा लग्नासाठी केलेले धर्मांतरही बेकायदेशीर ठरवले जाईल. अशा उद्देशाने केलेले लग्न न्यायालयाकडून अवैध ठरवले जाऊ शकते. या विधेयकात “प्रलोभन” या संकल्पनेचा विस्तार करण्यात आला आहे. पैशांचे आश्वासन, नोकरी, भेटवस्तू, चांगले जीवनमान, मोफत शिक्षण यांसारख्या गोष्टींचा वापर करून धर्मांतर केल्यास तेही गुन्हा मानला जाईल. या कायद्यांतर्गत बेकायदेशीर धर्मांतरासाठी सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जर गुन्हा महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तींशी संबंधित असेल, तर दंडाची रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. तसेच दोन किंवा अधिक व्यक्तींचे एकत्र धर्मांतर झाल्यास त्याला “समूह धर्मांतर” मानले जाईल आणि त्यावरही कारवाई करुन शिक्षा केली जाईल. पुन्हा गुन्हा केल्यास शिक्षा आणखी कठोर होणार असून अशा प्रकरणांत दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सात लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर एखादी संस्था किंवा संघटना बेकायदेशीर धर्मांतरात सहभागी असल्याचे आढळले, तर सरकार तिची नोंदणी रद्द करू शकते आणि आर्थिक मदतही थांबवू शकते. विधेयकात आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना आई-वडिलांच्या मालमत्तेवर वारसा हक्क मिळणार आहे. तसेच मुलांच्या संगोपनासाठी आणि देखभालीसाठी संबंधित कायद्यांनुसार आर्थिक मदतीची तरतूदही लागू राहील. मुलाची कस्टडी साधारणपणे आईकडे राहील. हे विधेयक मंजूर झाल्यास धर्मांतराचे नियमन करणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील किमान दहावे राज्य ठरेल. याआधी झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांनी अशा प्रकारचे कायदे लागू केले आहेत. सध्या हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले असून त्यावर पुढील चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावित कायद्याकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, बारमध्ये खंडणीसाठी हैदोस घालणारी टोळी गजाआड!

Next Post

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास; मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्देश

admin

admin

Next Post
सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास; मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्देश

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास; मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION