नवी दिल्ली: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर लगेचच भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्याला या दौऱ्यावर संघाचे कर्णधारपद मिळण्याची खात्री आहे, याआधीही हार्दिकने टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यावर टी-२० मालिकेत २-० असा विजय मिळवून दिला होता. भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. हे सर्व सामने मलाहाइड क्रिकेट क्लब ग्राउंड किंवा द व्हिलेज, डब्लिन येथे खेळवले जातील. या आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघात आयपीएलमधील काही स्टार खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेसाठी येत्या काही दिवसात भारतीय संघ जाहीर केला जाणार आहे.
आयसीसी भारतीय संघ सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे हे सर्वांना माहीत असेल. अशा स्थितीत आयर्लंड या दौऱ्यावर भारताला हलक्यात घेणार नाही. क्रिकेट आयर्लंडचे मुख्य कार्यकारी वॉरन ड्युट्रोम यांनी मंगळवारी सांगितले की, १२ महिन्यांत दुसऱ्यांदा भारताचे आयर्लंडमध्ये स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. भारत पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. जिथे भारतीय संघाला दोन कसोटी, नंतर तीन वनडे आणि शेवटी पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. म्हणजेच ऑगस्टमध्ये भारत एकूण आठ टी-२० सामने खेळणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी-२० मालिकेचं वेळापत्रक
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, १८ ऑगस्ट.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, २३ ऑगस्ट.





