पनवेल : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे विविध स्थानकांवर ‘नव दुर्गा’ पथकाद्वारे विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागाच्या सर्व महिला विशेष तिकीट तपासणी बॅचेस तेजस्विनी द्वारे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश तिकीट-तपासणीच्या प्रयत्नांना बळकटी देणे, विशेषत: सणासुदीच्या वेळी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. सर्व महिला तिकीट तपासणी तेजस्विनी बॅच १, २, ३, ४ आणि विशेष तुकडी १ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत सक्रीयपणे तिकीट तपासत आहेत. प्रवाशांमध्ये अनुपालन सुनिश्चित करत आहेत. या कालावधीत या बॅचने वैध विनातिकिट प्रवास करणार्या एकूण ११ हजार ९७१ प्रवाशांना पकडले आहे आणि ३३ लाख ९८ हजार ७३२ इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये वातानुकूलीत लोकलमधील १८६० प्रवाशांकडून ६ लाख ४८ हजार ५७० दंड वसूल केला गेला. प्रथम श्रेणीतील ४ हजार ६२२ प्रकरणात प्रवाशांकडून १४ लाख ३८ हजार ५५० दंड म्हणून वसूल केला गेला. द्वितीय श्रेणीतील ४ हजार ६६४ प्रकरणात प्रवाशांकडून १२ लाख १५ हजार ८८२ दंड वसुली. बुक न केलेले सामान असलेले ८२५ प्रकरणी प्रवाशांकडून ९५ हजार ७३० दंड वसूल केला गेला.
तेजस्विनी बॅचेस, नियमित तिकीट तपासणी मोहिमेद्वारे प्रवाशांना आरामदायक प्रवास देण्यासाठी आणि स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये त्यांच्या उपस्थितीने प्रवासी वैध तिकीट खरेदी आणि प्रवास करतील याची खात्री करतात. हा उपक्रम प्रवासी-अनुकूल वातावरण राखून प्रवासी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. नवरात्रीच्या उत्साहात आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सुरू असलेल्या या विशेष तिकीट-तपासणी मोहिमा शक्तीच्या प्रतीक आहेत. ज्यामध्ये महिला कर्मचारी सामर्थ्य आणि समर्पण रूप देत आहेत. तेजस्विनी बॅचेस, नियमित तिकीट तपासणी मोहिमेद्वारे प्रवाशांना आरामदायक प्रवास देण्यासाठी आणि स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये त्यांच्या उपस्थितीने प्रवासी वैध तिकीट खरेदी आणि प्रवास करतील याची खात्री करतात. हा उपक्रम प्रवासी-अनुकूल वातावरण राखून प्रवासी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे.