पुणे : भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर मोठे हल्ले केले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या 24 मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने देखील तो प्रयत्न हाणून पडला. तसेच पाकिस्तानवर काउंटर अटॅक देखील केला. दरम्यान या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पुणे पोलिस देखील सतर्क झाले आहे.
पुणे शहरात देखील भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची देखील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील शिवाजी रस्त्यावर आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमरणात गर्दी करत असतात. दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाल्याने देशातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच दृष्टीने पुणे पोलिसांनी देखील खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. दगडूशेठ हलवाई गणती मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. इथे येणारया प्रत्येकावर लक्ष ठेवले जात आहे. पुणे शहरात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच संवेदनशील भागात नाकाबंदी केली जात आहे. पुण्यातील अनेक भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.







