रत्नागिरी : गावाखेड्यातील मुले शाळेला- कॉलेजला जातात एसटी बसचा वापर करतात. अनेकदा एसटी बस उशिराने असतात किंवा रद्द होतात. मात्र याबाबत माहिती विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी तासनतास स्टँडवर उभे राहावे लागते. दरम्यान, एसटी कधी येणार याबाबत कोणालाच माहित नसते. याचसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एसटी वेळवर आली नाही किंवा रद्द झाली तर विद्यार्थ्यांना हेल्पलाइन नंबरवरुन मदत मागता येणार आहे.
एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी १८००२२१२५१ हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. यावरुन विद्यार्थ्यांना तक्रार करता येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना जर काही अडचण आली तर विद्यार्थी किंवा मुख्याध्याप विभाग नियंत्रकांना संपर्क साधून समस्या मांडू शकतात. बस उशिरा सुटल्याने किंवा रद्द झाल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशिर होतो. अनेकदा परीक्षेसाठी उशिर झाल्यावर परीक्षेला बसून दिले जात नाही. आता विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीसाठी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे.







