मुंबई : शाळा म्हटलं कि आठवते ते निरागस बालपण मस्ती खोड्या. पण हे सगळं पूर्वीच्या काळी ऐकायला अधिक छान वाटायचं पण आता या सगळ्या शब्दांना काहीही अर्थ राहिलेला नाही. महाराष्ट्रात राजकारणासोबतच इतरहि गोष्टी झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता शाळेत शिक्षकांच्या अघोरी शिक्षांमुळे शाळेतील वातावरण प्रचंड बदलेले दिसत आहे.
वसई येथील एका शाळेतील सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विध्यार्थी शाळेत उशिरा आल्याबद्दल शिक्षा म्हणून १०० उठाबशा काढायला लावल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकांमध्ये एकच संतापाची लाट पसरली. आणि या प्रकाराची सरकारने देखील गांभीर्याने दखल घेतली. आणि वसई येथील या शाळेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्याशिवाय शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी एक नियमावली जारी केली. ज्यात विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा देण्यास मोठी बंदी घातली आहे. राज्य शिक्षण विभागाने जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार महाराष्ट्रातील शाळांना आता अधिक कठोर बाल सुरक्षा आराखड्याचे अगदी नेटाने पालन करावे लागेल. ज्यात प्रामुख्याने शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळा यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील जर अशा घटना घडल्या तर या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांना वेळेत अहवाल देणे बंधनकारक असणार आहे. हे निर्देश केंद्र सरकारच्या ‘शालेय सुरक्षा आणि संरक्षणावरील मार्गदर्शक तत्त्वे (२०२१)’ सर्व शाळांवर, मग त्या कोणत्याही मंडळाच्या किंवा व्यवस्थापनाच्या असल्या तरीही, त्यांच्यासाठी हे नियम बंधनकारकच असणार आहेत.






