वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात टाकला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने धूळ चारली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव करून मलिका जिंकली.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली त्याने मायदेशात पहिली मालिका जिंकली आहे आणि त्यासोबत २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सात सामने खेळले असून भारताने चार सामने जिंकले आहेत, दोन गमावले आहेत आणि एक अनिर्णित राहिला आहे. यासह, अरुण जेटली स्टेडियमवर भारताने आपली अजिंक्य मालिका कायम रखण्यास यश मिळवले आहे. भारतीय संघाने या मैदानावर आता सलग १४ कसोटी विजय मिळवण्याची किमया साधली आहे. ज्याची सुरुवात मार्च १९९३ मध्ये झिम्बाब्वेवर एक डाव आणि १३ धावांनी विजय मिळवून झाली होती. ही भारताची मायदेशात सर्वात मोठी अजिंक्य मालिका राहिली आहे. मोहाली आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारताच्या १३ सामन्यांच्या अपराजित मालिकेचा हा विक्रम ठरला आहे.







