मुंबई : मुंबईतून कोकणात रो-रोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ऑक्टोबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. भाऊचा धक्का ते जयगड व तिथून पुढे विजयदुर्ग अशा या सेवेचा प्रवास असणार आहे. तिचा वेग दक्षिण आशियातील सर्वात वेगवान म्हणजे २५ नॉट्स असेल त्यामुळे कमी कालावधीत प्रवाशांना इच्छितस्थळी पोचता येईल. भाऊचा धक्का येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी ही सेवा चालवली जाईल. यासाठी १४७ परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू राहील. भविष्यात या रो रो सेवेला श्रीवर्धन व माणगाव येथे थांबे दिले जातील.
वाहनक्षमता – प्रवासी : ६५६ / चारचाकी – ५० / दुचाकी- ३०
प्रवासाचा कालावधी –
मुंबई – रत्नागिरी- ३ ते ३.५ तास
मुंबई – सिंधुदुर्ग – ५ ते ५.५ तास
आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. हा जलद प्रवास असेल. ३० वर्षांनंतर पुन्हा ही सेवा सुरू होतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संकल्पना मांडली होती, अशी प्रतिक्रीया मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिली.
प्रवासादरम्यानची जेटी-स्थानके –
- मुंबई : भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ)
- रत्नागिरी : जयगड
- सिंधुदुर्ग : विजयदुर्ग
(४० किमीवर बस सुविधा मिळेल)
प्रति प्रवासी – भाडे – रु.
फर्स्ट क्लास – ९,०००
बिझनेस क्लास – ७,५००
प्रीमियम इकॉनॉमी – ४,०००
इकॉनॉमी – २,५००







