मुंबई : अजित पवार यांच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे भाजप शिंदे गटात धुसफुसस वाढलेली आहे, असा आरोप अंधारे यांनी केला. अजित पवार गट भाजप शिंदे गटाच्या सत्तेत सहभागी झाल्यामुळे आणि सरकारविरोधात वाढलेल्या नकारात्मकतेला घाबरून शिंदे-भाजपा-अजित पवार गट कोणत्याच निवडणुकीला सामोरे जात नाही. मग ती कोणतीही निवडणूकी असो अशी रोखटोक टीका अंधारे यांनी केली आहे. नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांना तडकाफडकी स्थगिती देण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सरकारला सिनेटच्या निवडणूका रद्द करण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी सरकारला केला होता. याच दरम्यान आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी थेट याच मुद्द्यावर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
सिनेटवरून अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या फायर बँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप-शिंदे गटावर तोफ डागली आहे. अंधारे यांनी, भाजप विषयीची मतदारांच्या मनात नकारात्मकता वाढलेली आहे. तर हे सर्व नेते सध्या सत्तासंघर्षात व्यस्त झाले आहेत. तर अजित पवार यांच्या सत्तेतील एन्ट्रीमुळे भाजप शिंदे गटात धुसफुस वाढलेली आहे, असा आरोप अंधारे यांनी केला. अजित पवार गट भाजप शिंदे गटाच्या सत्तेत सहभागी झाल्यामुळे आणि सरकारविरोधात वाढलेल्या नकारात्मकतेला घाबरून शिंदे-भाजपा-अजित पवार गट कोणत्याच निवडणुकीला सामोरे जात नाही. मग ती कोणतीही निवडणूकी असो अशी रोखटोक टीका अंधारे यांनी केली आहे.