• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन

अटलजींचे जीवन भावी पिढ्यांसाठी नेतृत्व, शालीनता आणि नीतिमत्तेचा आदर्श

admin by admin
July 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन आपण सार्वजनिक जीवनात प्रवेश केला असून, भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता, संयम, नीतिमत्ता आणि लोकशाही मूल्यांचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यांनी अटलजींच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन जिष्णु देव वर्मा यांनी केले. अटलजींच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील संस्मरणीय घटनांचा वेध घेणाऱ्या ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र लोकभवन येथे झाले. अटलजींचे माध्यम सल्लागार म्हणून दीर्घकाळ कार्य केलेले अशोक टंडन यांनी हा ग्रंथ लिहिला असून, वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, नेता कसा असावा, विरोधी पक्षनेता कसा असावा आणि सत्तेत असताना लोकशाही मूल्यांचे पालन कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होत. ते प्रभावी वक्ते, दूरदृष्टीचे विचारवंत आणि सुसंस्कृत राजकारणी होते. उत्तरपूर्व भारतातील कठीण परिस्थितीत पक्षाचे काम करत असताना अटलजी कार्यकर्त्यांना सातत्याने प्रेरणा देत असत. त्यांच्याकडे भेटीस गेल्यावर ते उत्तरपूर्वेकडील प्रतिनिधींना प्रथम भेट देत असत. विरोधी पक्षात असताना जसे ते संयमी आणि तत्त्वनिष्ठ होते, तसेच पंतप्रधान झाल्यानंतरही राहिले. केवळ तेरा दिवसांचे सरकार संकटात आले तरी त्यांनी आपल्या वैचारिक बांधिलकीशी तडजोड केली नाही. संसदेचे तत्कालीन अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी ‘भारतीयता’ची व्याख्या विचारली असता, “आपण बंगालचे असूनही आपले नाव ‘सोमनाथ’ हे पश्चिम भारताशी जोडलेले आहे, हीच भारतीयता आहे,” असे अटलजींनी दिलेले उत्तर त्यांच्या व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोनाचे दर्शन घडवणारे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आज कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा अणुऊर्जा, कोणतेही सामर्थ्य योग्य मूल्ये आणि नीतिमत्तेशिवाय समाजाच्या हितासाठी उपयोगी पडू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. आज अनेकांना अल्पावधीत मोठे नेतृत्व मिळवण्याची घाई असते; मात्र अटलजींनी आयुष्यभर कोणताही शॉर्टकट स्वीकारला नाही आणि संयम, प्रामाणिकपणा व तत्त्वनिष्ठेच्या बळावर लोकांचा विश्वास संपादन केला, असे राज्यपालांनी स्पष्ट केले.

यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘अटल संस्मरण’ हा उच्च साहित्यिक मूल्य असलेला, अटलजींच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे सांगितले. लेखक अशोक टंडन यांनी अनेक वर्षे अटलजींसोबत निकटून काम केल्यामुळे या ग्रंथातील प्रत्येक अनुभव वास्तवदर्शी, प्रेरणादायी आणि वाचकाला अंतर्मुख करणारा ठरला आहे, असे त्यांनी नमूद केले. अटलजींचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय होते; तरी त्यांच्या विचारांत, भाषणांत किंवा वागण्यात कधीही कटुता नव्हती. ते प्रभावी वक्ते, सुसंस्कृत राजकारणी आणि लोकशाहीवरील अढळ विश्वास असलेले नेते होते. मतभेद असले तरी संवाद आणि सहमतीच्या मार्गाने राजकारण करण्याची शिकवण त्यांनी देशाला दिली. कवीहृदय लाभलेले अटलजी स्वभावाने अत्यंत संवेदनशील होते; मात्र राष्ट्रीय हिताचा प्रश्न निर्माण झाला की ते वज्रासारखे ठाम आणि कठोर निर्णय घेणारे नेतृत्व ठरत. देशाला अणुऊर्जा संपन्न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अनेक राष्ट्रांनी भारतावर निर्बंध लादले, तरी त्यांनी कोणताही दबाव न स्वीकारता राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले, असे शेलार यांनी सांगितले. लेखक अशोक टंडन यांनीही अटलजींसोबत सहा वर्षे काम करताना आलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तेरा दिवसांचे सरकार स्थापन होण्यामागील घडामोडी, त्याकाळातील राजकीय परिस्थिती आणि विविध पक्षांच्या भूमिकांबाबत त्यांनी अनेक संस्मरणीय प्रसंग कथन केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेला हा ग्रंथ अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिलेली शब्दांजली असून, त्यांच्या विचारांचा आणि सार्वजनिक जीवनातील आदर्शांचा परिचय पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाशन समारंभाला गायक अनूप जलोटा, रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Next Post

व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात!

admin

admin

Next Post
व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात!

व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

August 26, 2026
गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

August 26, 2026
भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

August 26, 2026
कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

August 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,889)
  • मुंबई (3,401)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (514)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

August 26, 2026
गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

August 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

राज्यात PUC तपासणी शुल्कात २० टक्क्यांची वाढ; नवे दर लागू!

August 26, 2026
गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

गणेशोत्सवातील प्रसाद वाटपासाठी परवाना अनिवार्य! – FDAचा कडक इशारा

August 26, 2026
भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

भुलेश्वर अपघातानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये; मोठ्या गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस सर्टिफिकेट’ बंधनकारक!

August 26, 2026
कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूचा कहर; H1N1 बाधितांचा आकडा ३००० पार!

August 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION