नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात महान साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांना आदरांजली वाहिली आणि म्हटले की, वंदे मातरम् हा ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या संघर्षाचा मंत्र होता. तोच वंदे मातरम् हा मंत्र आता राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. रॅलीला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या काही भाजपा कार्यकर्त्यांच्या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि कुटुंबांचे सांत्वन केले. या दुःखाच्या वेळी केंद्र सरकार पीडित कुटुंबांसोबत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या सोबत आहे. जीएसटीमुळे पश्चिम बंगाल आणि संपूर्ण देशातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे . दुर्गा पूजा आणि इतर सणांमध्ये देशभरातील लोकांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. गंगा बिहारमधून बंगालमध्ये वाहते. बिहारने बंगालला मार्ग दाखवला आहे. बंगाल जंगलराजापासून मुक्त झाला पाहिजे. सर्व वयोगटातील लोकांची तीच मागणी आहे. पश्चिम बंगालच्या लोकांसाठी मनापासून समर्पित आहेत. राज्यासाठी निधी आणि धोरणांची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी दिली.







