मु़ंबई (शुद्धोदन कठाडे) : आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाने राज्यातील ४८ मतदार संघावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे शिवसेनेची रणनिती काय असावी, कोणत्या मतदार संघात शिवसेना मजबूत आहे, कुठे भर देण्याची आवश्यकता आहे, याबाबतची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरापर्यंत शिवसेना खासदारांची बैठक घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकीवरती या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
शिवसेनेकडे सध्या तेरा खासदार आहेत. यापैकी किती खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात, कुठल्या मतदारसंघामध्ये अधिक काम करावे लागेल. या विषयावर या बैठकीत सखोल चर्चा झाली. गेल्याच आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबई दौऱ्यावर आलेले असताना त्यांची एकनाथ शिंदेसोबत एक तास बंद दाराआड चर्चा झाली होती.
लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेची जास्तीत जास्त मदत व्हायला हवी,यासाठीच अधिकाधिक जागा निवडून आणल्या पाहिजे, असा स्पष्ट संदेश नड्डा यांनी शिंदेंना दिला असल्याचे कळते. याच पार्श्वभूमीवर शिंदेनी काल रात्री उशिरा खासदारांची बैठक बोलवली होती, अशी माहिती सुत्रांनी दिली.
काल जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या बैठकीत शिवससेनेचे १३ खासदार उपस्थित होतो. भाजपाच्या नड्डांनी सद्या तरी लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे.त्यामुळे शिवसेनेची आगामी लोकसभा निवडणूकीबाबत स्पष्ट असावी यावर बैठकीत जोर देण्यात आला.
भाजपासोबत जागावाटपाबाबत कुठलीही चर्चा झालेली नसतानाही लोकसभा निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचे उघड आहे. नड्डांनी व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे फलनिश्पत्ती व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आहे.
लोकसभेची आगामी रणनीती कशी असावी, कोणता उमेदवार कोणत्या ठिकाणी उभा असावा, लवकरच याबाबचची घोषणा करण्यात येईल, जागावाटपाबाबत चर्चा होऊन, शिवसेना आपल्या जागा कायम ठेवून निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहे असेच दिसते.