मुंबई : भारताचा संघ आगामी मालिका इंग्लंडविरुद्ध टीम सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे खेळाडू चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी सध्या देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कालपासून दिल्लीचा संघ रेलवे विरुद्ध सामना खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. काल आणि आज या दोन संपूर्ण स्टेडियममधील चाहते विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी उत्साही होते. यावेळी स्टेडियममध्ये असलेल्या चाहत्यांची आता निराशा झाली. रेल्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. त्याला हिमांशू सांगवानने बाद केले. यश धुल धुलाई होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर विराट कोहली मैदानात उतरला. विराट कोहलीचे मैदानावर जोरदार स्वागत करण्यात आले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात शतक झळकावल्यापासून विराट कोहली खराब फॉर्मशी झुंजत होता. हरवलेली लय परत मिळवण्यासाठी विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. पण इथेही त्याची बॅट शांत राहिली. त्याने ५व्या चेंडूवर एक धाव घेत आपले खाते उघडले. २८व्या षटकात त्याने हिमांशूला चौकारही लगावला. पण पुढे जाऊन पुढच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना तो चेंडू चुकला आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि थेट स्टंपवर गेला. कोहलीने १५ चेंडूंचा सामना केला आणि १ चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. त्याला बाद करताना हिमांशू सिंगला खूप आनंद झाला असावा. पहिले म्हणजे त्याने विराट कोहलीची मोठी विकेट घेतली आणि दुसरे म्हणजे त्याने इतक्या मोठ्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. विराट कोहली तब्बल १३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी परतला आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये तो गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध शेवटचा खेळला होता.





