ठाणे : भिवंडी येथे “मेरी पाठशाला” या संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आज विचित्र प्रकार पहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ माजला. पोलिसांनी यावेळी १९ आंदोलकांना ताब्यात घेतलं.
काय आहे हा प्रकार?
भिवंडी येथे गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यांना मेरी पाठशाला या संघटनेनं पाठबळ दिलं आहे. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. परंतू आज दुपारी या ठिकाणी एका विद्यार्थ्यानं भाषण देत असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर याठिकाणी हा सगळा गोंधळ सुरु झाला. या प्रकाराची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली पहायला मिळालं. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य लाठीचार्जही करावा लागला. यामध्ये आतातपर्यंत १४ पुरुष आणि ५ महिला अशा १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.