मुंबई : शांततेचं प्रतीक समजल जाणारी कबुतरे आज शहरी आरोग्याला गंभीर संकट ठरू लागली आहेत . मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरी भागात कबुतरांची वाढती गर्दी ही केवळ सौंदर्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न न राहता थेट श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर आजारांचे मूळ कारण बनत आहे. विशेषतः बहुमजली इमारतींमध्ये गॅलऱ्या, टेरेस आणि पाईपलाईन यांसारख्या ठिकाणी कबुतरांनी केलेली घरटी आणि साचलेली विष्ठा यामुळे ‘हायपरसिटीव्हिटी न्यूमोनायटिस’, ‘क्रिप्टोकॉक्कोसिस’ ‘बर्ड फॅन्सियर्स लंग’ अशा अनेक दुर्मिळ पण जीवघेण्या फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे.







