• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महायुतीविरोधात छत्रपतींच्या पुतळाप्रकरणावरुन आक्रमक भूमिका; आघाडीचे रविवारी ‘जोडे मारो’ आंदोलन

आघाडीचे रविवारी 'जोडे मारो' आंदोलन; छत्रपतींच्या पुतळाप्रकरणावरुन महायुतीविरोधात आक्रमक भूमिका

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 29, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलना’ची हाक दिली आहे. एक सप्टेंबरला गेटवे ऑफ इंडियाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन केले जाणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीला उद्धव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते. विधानसभेच्या २८८ जागांपैकी अनेक जागांवरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. शिवाय छोट्या घटक पक्षांनाही सामावून घ्यायचे आहे. यासंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक सप्टेंबरच्या आंदोलनाची घोषणा केली. यावेळी जागावाटपावर भाष्य करणे त्यांनी टाळले. राजकोट किल्ल्यावर घडलेला प्रसंग दुर्दैवी असून, यामागे भाजपचे गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप या नेत्यांनी केला. एक सप्टेंबरला दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेटवे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारच्या प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ केले जाणार आहे.

‘राज्यातील सरकार हे महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही आहे. यांच्या नसानसांत शिवद्रोह ठासून भरला असून, महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा दाखला देऊन ताशी ४५ किमी वेगाच्या वाऱ्यांमुळे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. या विधानाचा ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘मुख्यमंत्र्यांनी दिलेले कारण निर्लज्जपणाचे आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे समुद्रकिनारी राजभवनावर राहत होते. त्यांनीही महाराजांचा अपमान केला होता; पण समुद्रावरील जोरदार वाऱ्यांमुळे माजी राज्यपाल कोश्यारी यांची टोपी उडाली, असे माझ्या तरी वाचनात कुठे आले नाही,’ असा टोला ठाकरे यांनी या वेळी लगावला.  ‘राज्य सरकारने नौदलावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे; पण आपले नौदल इतके पोकळ नाही. त्यांना समुद्रकिनारी वाहणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज असतो. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कोकण जिंकायचे या ईर्ष्येने घाईघाईत मालवणला कार्यक्रम घेण्यात आला. नवख्या शिल्पकाराकडून ठरावीक वेळेत पुतळा करून घेण्यासाठी दबाव टाकला गेला. समुद्रकिनारी पुतळा उभारताना कोणती काळजी घ्यावी, याचा अभ्यास केला नाही,’ अशी टीकाही ठाकरे यांनी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची भाजप युतीच्या नेत्यांची हिंमत होते कशी,’ असा सवाल नाना पटोले यांनी केला. ‘भ्रष्टाचाराचा कलंक लागलेल्या एका खासदाराने महाराजांचा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवून महाराजांचा अपमान केला. आता मुख्यमंत्री म्हणतात, यापेक्षा मोठा पुतळा बसवू. या कमिशनखोर सरकारला अक्कल कधी येणार? राज्यात आज महिला, शाळेतील मुलीही सुरक्षित नाहीत. जनतेत सरकारविरोधात आक्रोश आहे. घाबरलेले सरकार जनतेचा उठाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे,’ असे पटोले म्हणाले. ‘पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेला पुतळा कोसळणे दुर्दैवी आहे. ही घटना पाठीशी घालण्यासाठी विविध विधाने केली जात आहेत. त्यावरून भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे, हे दिसते. लोकांमध्ये सरकारविरोधात तीव्र भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करणार आहोत,’ असे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

Previous Post

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

५० लाखांची शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

५० लाखांची शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION