मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता दिल्ली मेट्रोप्रमाणेच मुंबई लोकल ट्रेनचे दरवाजेही बंद होणार आहेत. अलिकडच्या काळात झालेल्या अपघातांना पाहता रेल्वे बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या एसी लोकलच्या तिकीटाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच मुंबईतील सर्व लोकल एसी होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एसी लोकलचं तिकट वाढणार नाही. लोकलच्या तिकीटाच्या दरातच एसी लोकलचं तिकीट मिळणार असल्याची मुख्यमंत्री म्हणालेत. काही महिन्यांपूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान विचित्र घटना घडली होती. गर्दीमुळे लोकलच्या दारात उभे असलेले प्रवाशी रेल्वे रुळावर पडले. यात जवळपास ५ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने चेन्नईतील कारखान्यात असे डबे बनवण्यास सुरुवात झाली आहे. आता लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील. ऑक्टोबरपासून ही नवीन सुविधा चाचणी तत्त्वावर सुरू केली जाईल आणि वर्षाच्या अखेरीस ही ट्रेन मुंबईच्या रुळांवर धावण्यास सुरुवात करेल. रेल्वे स्थानकावर थांबताच दरवाजे उघडतील. प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी निश्चित वेळ मिळेल. दरवाजे बंद झाल्यानंतरच ट्रेन धावेल. सुरुवातीला प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये असे २ डबे बसवले जातील. रेल्वेने २०२३ मध्येही अशी चाचणी घेतली होती पण तांत्रिक अडचणींमुळे ती यशस्वी झाली नाही. यावेळी जुन्या चुका दुरुस्त करून नवीन प्रणाली तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली लागू केल्याने प्रवास अधिक सुरक्षित होईल. गर्दीदरम्यान पडण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता कमी होईल आणि तुम्हाला मेट्रोसारखा अनुभव मिळेल.







