• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातच पाणीबाणी; वॉटर फिल्टर्स आणि टाक्या उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू!

admin by admin
July 10, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातच पाणीबाणी; वॉटर फिल्टर्स आणि टाक्या उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मंत्रालयातील दूषित पाणीपुरवठ्याच्या संशयामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि तापाच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीची पावले उचलली आहेत. मंत्रालय प्रशासनाने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयातील पाणीपुरवठ्याचे पाणी पिणे टाळण्याच्या सूचना देत त्याऐवजी बाटलीबंद किंवा इतर सुरक्षित पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनेक कर्मचारी पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि तापाने त्रस्त असल्याने मंत्रालयातील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. मंत्रालयाला मुंबई महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी प्रथम जमिनीखालील जलसाठा टाक्यांमध्ये साठवले जाते आणि त्यानंतर विविध कार्यालयांमध्ये वितरित केले जाते. पालिकेच्या नियमानुसार या टाक्यांची दर सहा महिन्यांनी साफसफाई केली जाते आणि शेवटची साफसफाई एप्रिल २०२६ मध्ये करण्यात आली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयातील सर्व जलसाठा टाक्यांमधील पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी जमिनीखालील चारपैकी दोन टाक्यांमधील पाणी पूर्णपणे काढून टाकण्यात आले असून उर्वरित दोन टाक्यांमधील पाणीही रात्रीपर्यंत रिकामे करण्यात येणार आहे. त्यानंतर इमारतीच्या छतावरील टाक्यांमधील पाणी शनिवारी काढून सर्व टाक्यांची संपूर्ण साफसफाई करण्यात येणार आहे. याशिवाय मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या कूलर्सना जोडलेल्या सर्व ३३ वॉटर फिल्टर्सची साफसफाई आणि सर्व्हिसिंगही करण्यात आले आहे. प्रशासनाने पाण्याचे नमुने मुंबई महानगरपालिकेकडे तपासणीसाठी पाठवले असून तपासणी अहवाल येईपर्यंत कार्यालयातील पाणी न पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दूषित पाण्याच्या संशयामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्रालयातील दवाखान्यात उपचारासाठी गर्दी केली असून काहींना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही घेण्यात आली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि शिवसेना (शिंदे गट)च्या आमदार मनिषा कायंदे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत मंत्रालयासारख्या राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय कार्यालयात निकृष्ट दर्जाचे किंवा दूषित पाणीपुरवठा होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावेळी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र तपासणीत कोणतीही त्रुटी आढळली नव्हती. काही कर्मचाऱ्यांनी त्यावेळी तपासणीसाठी टाकीतील पाण्याऐवजी बाटलीबंद पाण्याचे नमुने पाठवले गेल्याचा संशय व्यक्त केला होता. मंत्रालयात अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बाटलीबंद पाण्याची व्यवस्था असली तरी बहुतेक कर्मचाऱ्यांना टाक्यांमधून पुरविण्यात येणारे पाणीच वापरावे लागते, अशीही बाब पुढे आली आहे. सध्या प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षित पाण्याचाच वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

रायगड पूर : ३ हजार एलपीजी सिलेंडर पाण्यात वाहून गेले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

Next Post

पूरस्थिती ओसरताच वसई-विरारमधील शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू; सहा दिवसांनंतर विद्यार्थ्यांचा वर्गात परतावा!

admin

admin

Next Post
पूरस्थिती ओसरताच वसई-विरारमधील शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू; सहा दिवसांनंतर विद्यार्थ्यांचा वर्गात परतावा!

पूरस्थिती ओसरताच वसई-विरारमधील शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू; सहा दिवसांनंतर विद्यार्थ्यांचा वर्गात परतावा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (483)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,875)
  • मुंबई (3,394)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (512)
  • वसई-विरार (58)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

दारूच्या शुद्धतेवर थलपती विजय यांचा मोठा निर्णय; अल्कोहोलचे प्रमाण तपासणी कडक होणार

August 24, 2026
कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

कोकण किनारपट्टीवर ‘ग्रीन एनर्जी’चा महापूर; २.७६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

August 24, 2026
“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

“सरकारी शाळा सुधारण्यासाठी काय केलं?”; देशातील सर्व शिक्षणमंत्र्यांना अभिजित दिपके यांचा थेट सवाल

August 24, 2026
११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संपाचा इशारा; सलग सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची भीती!

August 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION