• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home जालना

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

admin by admin
July 29, 2026
in जालना
0
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून त्यांनी घोषणा करत, २८ ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा समाजाला जात प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अन्यथा २९ ऑगस्टपासून शेवटचे आणि निर्णायक आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत, यावेळी कोणतीही माघार घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज न्यायासाठी सातत्याने संघर्ष करत असून समाजाच्या संयमाची वारंवार परीक्षा घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी त्याला वेड्यात काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी समाजाने पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले. “२९ ऑगस्टला आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी अंतिम लढा सुरू होईल. एकही मराठा घरी थांबू नये,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सरकारवर ५८ लाख नोंदी उपलब्ध असूनही पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रे न दिल्याचा गंभीर आरोप केला. हैदराबाद गॅझेटमधील नोंदी वैध मानल्या जात असतील, तर त्यानुसार प्रमाणपत्रे देण्यास सरकार का टाळाटाळ करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यांनी तातडीने अर्ज करावेत आणि हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून ५८ लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. तसेच आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी करत, मराठा आंदोलकांवरील सर्व प्रकरणे मागे घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उपोषणानंतर सरकारने ओबीसी सवलती लागू करण्याबाबत शासन निर्णय काढल्याचा दावा केला होता, मात्र संबंधित विभागांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सारथी संस्थेच्या योजना केवळ कागदावरच असल्याचे सांगत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचाही अनेक तरुणांना अपेक्षित लाभ मिळालेला नसल्याची टीका त्यांनी केली. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली. सरकारला स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात नेमकी अडचण काय आहे, असा सवाल उपस्थित करत समाजाच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भाषणादरम्यान त्यांनी आणखी एक मोठा दावा करत, “२९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या प्रश्नांमध्ये अडथळे आणणाऱ्या नऊ जणांची नावे जाहीर करणार,” असे सांगितले. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. निवड प्रक्रियेत यशस्वी झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जात नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर दुजाभावाचा आरोप केला. ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला जातो, मग निवड झालेल्या मराठा तरुणांना नियुक्त्या का दिल्या जात नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेवटी त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत, “२९ ऑगस्ट रोजी गावागावातील मराठे वाघासारखे मैदानात उतरतील. हा लढा समाजाच्या भविष्यासाठी असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असे स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, २८ ऑगस्टपूर्वी सरकार कोणता निर्णय घेते आणि आंदोलन टाळण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

Next Post

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

admin

admin

Next Post
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,738)
  • मुंबई (3,309)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

‘माधुरी’च्या घरवापसीसाठी नांदणीत उपवास आणि प्रार्थना; १३ सप्टेंबरपूर्वी परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

July 29, 2026
गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

गुरुपौर्णिमेच्याच दिवशी दादरच्या फूल मार्केटवर फिरला बुलडोझर; व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट!

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION