मुंबई : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे २६ जुलै २०२५ कारगिल विजयी दिवस शहीद स्मारक, फोर्ट, मुंबई या ठिकाणी शेकडो माजी व सैनिक परिवार आणि देशभक्त नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. २६ जुलै १९९९ ला झालेल्या करगील युद्धाला २६ वर्ष पूर्ण झाली त्या युद्धाचे वास्तव आणि भयानकता याची संपूर्ण देशावासियांना जाणीव आहे. या युद्धामध्ये ५२७ भारतीय सैनिकांनी मातृभूमीसाठी अधम्य साहस आणि कर्तव्य परायणतेचा परिचय देत आपले सर्वोच्च बलिदान दिले, आणि असंख्य सैनिक घायल झाले. या युद्धात हजारो पाकिस्तानी सैनिक आणि उग्रवादी मारले गेले त्यांची पार्थिव शरीर ही पाकिस्तान घ्यायला तयार नव्हते. हे युद्ध म्हणजे पाकिस्तानची सोची- समजी साजिश होती वास्तव म्हणजे हे युद्ध नव्हते तर पाकिस्तान सैनिकांनी उग्रवाद्यांच्या मदतीने घुसखोरी केली होती. त्यांना भारताला अस्थिर करायचे होते, त्यावळचे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि जनरल परवेझ मुशरफ यांनी पीओके पासून भारताला तोडण्याचे षडयंत्र रचले होते. त्याला भारतीय सैन्याने हाणून पाडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर टीका झाली आणि दबाव ही टाकण्यात आला. आशा वेळी पाकिस्तानला युद्धातून पळ काढण्यापासून पर्यायच उरला नव्हता. २६ जुलै या दिवशी सैनिक फेडरेशनची स्थापना ही झाली होती.
सैनिक फेडरेशनचा वर्धापन दिन आणि कारगिल विजय दिवस राष्ट्रभक्तीच्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या युद्धात शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली आणि शहिदांच्या परिवाराच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्या तसेच शहीदांच्या स्मृतीस पुष्पहार व रिथ लेईंग करून भारत माता की जय आणि जय जवान च्या जय घोषाने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर जी सावंत हे होते. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीणजी दरेकर, कर्नल डी. राजा, आमदार सौ. मनीषा कायंदे, सामाजिक कार्यकर्त्या शायना एन.सी., निवासी जिल्हाधिकारी, राष्ट्रपती पुरस्कार विजेते अभिनेते अरुण नलवडे, अडिशनल कमिशनर समीर वानखेडे जी त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडेकर, जय भीम आर्मी अध्यक्ष नितीन मोरे, शिवराज्य ब्रिगेड अध्यक्ष अमोल जाधवराव, मुंबई विद्यापीठ माजी प्राचार्य दिलीप पाटील, बेडेकर लोणच्याच्या अध्यक्षा अनघा बेडेकर उपस्थित होते आमदार प्रवीण जी दरेकर यांनी आपल्या भाषणात मुंबईत सैनिकांसाठी सर्व सुविधायुक्त भव्य असे सैनिक भवन उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. सैनिकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या सोबत बैठक लावण्याचे आश्वासन ही दिले नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी श्री. समीर वानखडे यांनी देशातील ड्रग्स विरोधी मोहिमेची माहिती देत सैनिकांची भूमिका स्पष्ट केली. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सैनिक फेडरेशन ने सैनिकांसाठी केलेल्या कामांची माहिती उपस्थित सैनिक आणि परिवाराला दिली सर्व सैनिकांनी एकत्र येण्याचे आणि सैनिकांच्या भल्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सैनिक फेडेरेशन चे जन-सेक्रेटरी सुभेदार निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले व शेवटी उपाध्यक्ष सुभेदार सुभाष दरेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सैनिक फेडेरेशन मुंबई अध्यक्ष श्री फ्लेचर पटेल, कॅप्टन सुभाष चव्हाण राज्य सचिव, श्री रवींद्र घनबहादुर सचिव, उद्योग विभाग,श्री. सरदार चोपडे – राज्य सचिव, श्री. शत्रुघ्न महामुडकर राज्य सचिव, श्री शंकर वडकर जिल्हाध्यक्ष, वाशिम, श्री. युसुफ ख्वाजा सचिव, अकोला श्री. राजू पाटील जिल्हाध्यक्ष, ठाणे श्री. निलेश पाटील जिल्हाध्यक्ष, पालघर, श्रीमती शोभा गरंडे महिला ब्रिगेड, ठाणे, श्रीमती सुप्रिया उतेकर जिल्हाध्यक्ष, महिला ब्रिगेड, मुंबई, श्री. विजय जगताप जिल्हाध्यक्ष, रायगड, संघटक – श्री. पोपटराव दाते, धोंडी राहुल, सोपान जाधव, आशिष पाटील, आनंद पवार, संजय दळवी, अरविंद गव्हाणकर कार्यक्रमात अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी सहभाग घेतला. त्यात युनायटेड एक्स सर्व्हिस मॅन बदलापूर चे अध्यक्ष आबा बांदेकर आणि त्यांची टीम, इंडियन एक्स-सर्व्हिस मॅन लीग चे पदाधिकारी, पंचरत्न मित्र मंडळ, युथ कौन्सिल आदींचा समावेश होता. ठाणे, पालघर, रायगड, अकोला, वाशिम, अमरावती, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई आणि मुंबई जिल्ह्यांतील सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







