रत्नागिरी : शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत मनात नाही. शिवसेना ही एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालते ती शिवसेना आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे राहीलेले नाही. त्यामुळे शिवसेना विरुद्ध उबाठा अशीच लढत होईल; अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहिली जात आहे. यावर बोलताना दापोली मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले, कि उद्धव ठाकरे हें शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांचे राहिलेले नाही. केवळ ठाकरे आडनाव असल्याने त्यांना मान असल्याचे देखील कदम यांनी सांगितले.
लोकसभेला ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं त्यांनी आम्हाला शिवसेना, निष्ठा शिकवू नये. विनायक राऊतांनी गद्दाराची भाषा करु नये. त्यांनी त्यांच्या नेत्याकडे पहावं. उद्धव ठाकरेंनी कुठलं नेतृत्व, आंदोलन केलेलं नाही. त्यांनी गुंडांची भाषा वापरू नये. आमच्यावर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरे अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं यावर त्यांनी बोलावं, असा टोला देखील कदम यांनी ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे बॅग तपासणी केली. निवडणूक आयोग त्यांचे काम करते. शिंदेंची देखील बॅग तपासणी केली होती. मोठा नेता आहे म्हणून त्याची बॅग तपासली जाऊ नये; असा नियम नाही, असेही स्पष्ट केले.





