भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील नवघर तलाव व काशिमीरा येथील जरीमरी तलावात अनुक्रमे २० नोव्हेंबर व १० डिसेंबर रोजी विठू माऊलींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात होऊन त्यांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ठाणे येथील उपवन तलावात उभारण्यात आलेल्या ५१ फुटी विठू माऊ लींच्या मूर्तीप्रमाणे मिरा-भाईंदर शहरातील २ ठिकाणी विठू माऊ लींच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शहरातील विविध विकासकामांसाठी १ हजार ८०० कोटी रुपये आणि सीसी रस्त्यांच्या विकासासाठी ९०० कोटी रुपये निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील मौजे नवघर येथील आरक्षण क्रमांक २९९ मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यास शासनाने मान्यता दिली असून लवकरच त्यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिरा-भाईंदर शहर राज्याच्या शहरी विकासातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी शहरातील प्रत्येक प्रकल्प हा जनतेच्या हितासाठी राहील, असे स्पष्ट केले.







