वृत्तसंस्था : वाढता भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सोशल मीडियावरूल बंदी यावरुन नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरल्यानंतर आता हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. आंदोलकांना नियंत्रणात आणताना सोमवारी झालेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले. यामुळे संतप्त आंदोलकांनी मंगळवारीही आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे नेपाळमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. Zen G ने सरकारविरोधात केलेली निदर्शनं मंगळवारी आणखीनच उग्र झाली. आंदोलक इतके आक्रमक झाले होते की, त्यांनी संसेदसह अनेक इमारतींची जाळपोळ केली. अनेक मंत्र्यांची घरंही पेटवण्यात आली. इतकंच नाही तर माजी उपपंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आलं. नेपाळमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली असल्याने भारत सरकारने देशवासियांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. दरम्यान पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नेपाळमधील सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) बुधवारी भारतीय नागरिकांसाठी प्रवास अॅडव्हायजरी जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात, परिस्थिती स्थिर होईपर्यंत भारतीयांना नेपाळचा अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे.







