पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत चाललं आहे. पुण्यात एक दिवसाआड महिला अन् मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येताना आपल्याला दिसत आहे. पुण्यातील बोपदेव घाटामध्ये ३ ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कोंढवा सासवड रस्त्यावरील बोपदेव घाटात एका विद्यालयीन युवतीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली असून यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी एक मोठे पाऊल उचचले आहे. पुणे पोलिस लवकरच पुण्यातील सर्व टेकड्यांवर आणि घाटात सायरन आणि सर्च लाइट बसवणार आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. गेल्या काही वर्षांत पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. मात्र त्यात पुण्याची संस्कृती कुठेतरी हरवत चालली आहे का? असा सवाल पुणेकर नागरिक उपस्थित करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अत्याचाराच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आता पुणे पोलिस शहरांतील टेकड्यांवर आणि घाटात सर्च लाइट आणि सायरन बसवणार आहेत.
पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाइट बसवण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. बोपदेव घाटात २१ वर्षीय युवतीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. तीन आरोपीना पकडण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. मात्र या प्रकरणानंतर पुणे पोलिसानी सर्च लाइट आणि सायरन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. टेकड्या आणि निर्जन स्थळावरील गुन्हे रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. बोपदेव घाटात कॉलेजच्या तरुण तरुणींना लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वर्षापूर्वी एका साध्या वेशातील पोलीस कर्मचारी त्याच्या मैत्रिणीसोबत फिरण्यास आलेला असताना चाकूच्या धाकाने सोने चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. परंतु सत्यप्रकार सांगितला तर घरच्यांना समजल्यावर आपले काय होईल ? या भीतीपोटी देवाच्या दर्शनासाठी जात असताना घटना घडल्याचे खोटेच सांगितले जाते. वर्षभरात कित्येकवेळा असे प्रकार होत असताना त्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नसल्याचे दुर्दैव आहे. बोपदेव घाट आणि परीसरात तरुण तरुणींना हाणमार करून लुटण्याचे प्रकार सर्रास होत होतात. तसेच संपूर्ण घाट पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याने घाटाच्या पायथ्यालगत पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र दिवसा आणि रात्रीही पोलीस कर्मचारी फारसे घाटाकडे फिरकताना क्वचितच दिसतात. तसेच जे मदत केंद्र उभारण्यात आले आहे, त्यामळे आपत्कालीन प्रसंगी मदत मिळण्याची कोणतीही सुविधा अथवा महत्वाचे संपर्क नंबर नाहीत.