वृत्तसंस्था : आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) भारतातील टी-२० विश्वचषक सामने हलवण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. परंतु बीसीबीने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सामने न खेळण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. बीसीबीचे प्रतिनिधी, अध्यक्ष अमिनुल इस्लाम आणि सीईओ निजाम उद्दीन चौधरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयसीसीशी चर्चा केली.
बीसीबीने स्पष्ट केले की, त्यांच्या संघाच्या खेळाडू, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी नसल्यामुळे सामने भारताबाहेर हलवण्याची गरज आहे. याआधीही बीसीबीने आयसीसीला अनेक पत्रे पाठवून भारताबाहेर खेळण्याची मागणी केली होती. परंतु आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर केलेले असल्याने हा निर्णय घेणे कठीण असल्याचे स्पष्ट केले.मात्र बीसीबी आणि आयसीसी दोन्ही संस्था याबाबत उपाय शोधण्यासाठी चर्चा सुरू ठेवणार आहेत. सध्याच्या वेळापत्रकानुसार, ७ फेब्रुवारीपासून बांगलादेश संघ कोलकाता येथे तीन आणि मुंबईत एक सामना खेळणार आहे. आयपीएलमधून बांगलादेशच्या गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला रोस्टरमधून काढल्यामुळे बांगलादेश सरकारने संतप्त होऊन त्यांच्या देशात आयपीएलचे प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला.







