नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाती बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात ४००० रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात डबल गिफ्ट मिळणार आहे. त्यांच्या खात्यात दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार आहेत. पुढच्या महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीआधी शेतकऱ्यांना पैसे मिळतील.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. प्रत्येकी २००० रुपये असे तीन हप्ते दिले जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. या योजनेतही शेतकऱ्यांना २००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. दरम्यान, आता फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पीएम किसानचा याआधीचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुढचा २२ वा हप्ता येऊ शकतो. राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतदेखील पुढच्या महिन्यात पैसे देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली आहे. कृषी विभागाने वित्त विभागाकडे १ हजार ९३० कोटींचा निधी मागितला आहे. हा निधी मंजुरी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. जिल्हा परिषदेआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो.







