वृत्तसंस्था : मराठा आंदोलनाबाबत देवेंद्र फडणवीस सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनावेळी मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना मदत देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत सरकारकडून दोन सप्टेंबर रोजी त्यांना अश्वासन दिले होते. फडणवीस सरकारने आज मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ९ कोटी ६० लाख रुपये वर्ग केले आहेत. सरकारने आंदोलनातील महत्वाची मागणी पूर्ण केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनातील ही एक महत्त्वाची मागणी आता पूर्ण झाली आहे. मराठा आंदोलनात २५४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ९६ मृतकांच्या नातेवाईकांना काल ९ कोटी ६० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तर याआधी १५८ मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपया प्रमाणे मदत करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्व नातेवाईकांना अर्थिक मदत पूर्ण करण्यात आलीय.







