• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

'आरोग्यदायी अल्पोपहार' पुरवण्याचे शासनाचे कडक आदेश

admin by admin
September 2, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य सरकारने सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांतील बैठक, प्रशिक्षण कार्यक्रम, परिषद तसेच उपाहारगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्पोपहार आणि भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे सरकारी बैठकींमध्ये चहा, बटाटेवडे, बिस्किटे, नानकटाई आणि तेलकट किंवा अतिप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांऐवजी आरोग्यदायी व पौष्टिक आहार देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत सरकारी कार्यक्रमांमध्ये चहा-कॉफीसह बटाटेवडे, बिस्किटे आणि गोड पदार्थ दिले जात होते. मात्र, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा मेन्यू बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नवीन धोरणानुसार हंगामी फळे, केळी, सफरचंद, पेरू, पपई, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, नाचणी, ज्वारी आणि बाजरीच्या भाकऱ्या, विविध भाज्या, डाळी, उसळी आणि कोशिंबीर यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच गरम दूध, साखरविरहित ग्रीन टी आणि ताक यांसारख्या आरोग्यदायी पेयांनाही प्राधान्य दिले जाईल. स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देत संतुलित आहाराची सवय लागावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

याशिवाय सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांच्या नवीन खानपान (केटरिंग) करारांमध्ये आरोग्यदायी मेन्यूचा समावेश करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित विभागांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पौष्टिक आहाराविषयी जनजागृती करावी, तसेच संतुलित आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेअंतर्गत राष्ट्रीय पोषण संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेतला जाणार आहे. मंत्रालयातील उपाहारगृहात या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून, तेथे फळे, उकडलेली अंडी, कडधान्ये, पोहे, इडली-सांबार, गरम दूध आणि ग्रीन टी यांसारखे आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच जेवणात डाळ, उसळ, पालेभाज्या, पुलाव, कोशिंबीर आणि ताक यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमध्ये आरोग्यदायी आहार संस्कृतीला चालना मिळण्याबरोबरच तेलकट आणि कमी पोषक खाद्यपदार्थांचे सेवन कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

Previous Post

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

September 2, 2026
रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

September 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (57)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,113)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (486)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (107)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,922)
  • मुंबई (3,424)
  • रत्नागिरी (52)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (517)
  • वसई-विरार (60)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

एसटीला आर्थिक बळ देण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवा घेणार गती! – सरनाईकांचे निर्देश

September 2, 2026
रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

September 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION