अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा आठवडा विमान कंपन्यांसाठी अतिशय अडचणीचा ठरत असल्याचे दिसत आहे. अमहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक बिघाड, सुरक्षा धोक्यांसह विविध कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत किंवा वळवली जात आहेत. या सगळ्यात, एअर इंडियाने शुक्रवारी ८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत उड्डाणे समाविष्ट आहेत. उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनने देखभाल आणि ऑपरेशनल कारणे दिली आहेत. एअरलाइनने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाने या उड्डाणे रद्द केली आहेत.
दुबई ते चेन्नई – AI906
दिल्ली ते मेलबर्न – AI308
मेलबर्न ते दिल्ली – AI309
दुबई ते हैदराबाद – AI2204
पुणे ते दिल्ली -AI874
अहमदाबाद ते दिल्ली -AI456
हैदराबाद ते मुंबई -AI-2872
चेन्नई ते मुंबई -AI571
एअर इंडिया एअरलाइनने प्रवाशांना त्यांच्या वेबसाइटवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा किंवा अपडेटसाठी ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन केलं आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, ‘आमच्या विमानांची वाढती तपासणी, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि खराब हवामान यामुळे आम्हाला काही व्यत्यय येण्याची शक्यता आहे, ज्याची प्रवाशांना योग्यरित्या माहिती दिली जाईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या फ्लाइट्सची स्थिती airindia.com वर तपासावी किंवा आमच्या ग्राहक सेवा क्रमांक 011 69329333, 011 69329999 वर कॉल करावा. गुरुवारीच्या सुरुवातीला, एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाकडून 21 जून ते 15 जुलै 2025 पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे कमी केली जातील, आणि तीन मार्गांवरील ऑपरेशन तात्पुरते स्थगित केली जातील.







