मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनने भारतात आरोग्य, तंदुरुस्ती आणि प्रतिमानाची पुनर्व्याख्या केली आहे. हा संदेश देत, टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ च्या २०व्या आवृत्तीसाठी काउंटडाउन सुरू झाला आहे. यावर्षी २६९ स्वयंसेवी संस्था (एनजीओ), कॉर्पोरेट्स आणि नागरिकांनी सामाजिक हितासाठी एकत्रितपणे ४३ कोटी रुपये गोळा केले आहे. या कार्यक्रमासाठीची निधी उभारणी ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहील. टाटा मुंबई मॅरेथॉनने २००९ पासून युनायटेड वे मुंबईच्या नेतृत्वात परोपकारी उद्देशांसाठी निधी उभारणी केली आहे. या कार्यामध्ये ६०० कॉर्पोरेट्स आणि ७४० एनजीओंनी एकत्र येऊन ४२९ कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे. ही मॅरेथॉन परोपकारासाठी देशातील एक सर्वात मोठे क्रीडा मंच बनली आहे, जे सामाजिक बदल घडवते आणि देशभरातील समुदायांना सक्षम करते. जॉर्ज आयकारा, सीईओ, युनायटेड वे मुंबई, म्हणाले: २००९ पासून, आम्ही मॅरेथॉनला एक शक्तिशाली सामाजिक बदल घडवणारे साधन म्हणून विकसित होताना पाहिले आहे. या वर्षी, १३००० धावपटूंनी एकत्र चॅरिटीसाठी चांगला योगदान दिला आहे.” यावर्षी २२२ हून अधिक निधी उभारणाऱ्यांनी प्रत्येकी १ लाख रुपये उचलले आहेत. आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता आणि इतर अनेक कारणांसाठी सरासरी निधी उभारणाऱ्याने २ लाख रुपये उचलले आहेत. या उत्साहाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ६‘चेंज लेजेंड्स’ – सुश्री विली डॉक्टर, डॉ. बिजल मेहता, मीरा मेहता, सुनीत कोठारी, श्याम जसानी आणि उत्प्पल मेहता, ज्यांनी प्रत्येकी १ कोटींहून अधिक निधी उभारला आहे. कॉर्पोरेट सहभागामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, १६५ कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एकत्र करून निधी उभारणीमध्ये सहभागी केले आहे. एचडीएफसी बँकेने सर्वात मोठ्या टीमचा रेकॉर्ड तोडला, ज्यामध्ये १५०० धावपटूंनी सहभाग घेतला. यावर्षी विविध प्रेरणादायी कथांमध्ये, मिहान गांधी ढाल यांचा समावेश आहे, ज्यांनी १० किमी रनसाठी ६ लाख रुपये जमा केले. तसेच, १६ वर्षीय शौर्य बंगा, ज्याने ३० लाख रुपये जमा करून ऑस्कर फाउंडेशनला मदत केली. त्याचे म्हणणे आहे, “टीएमएमने मला फुटबॉलसारख्या खेळाच्या माध्यमातून सामाजिक बदलासाठी चांगले कार्य करण्याची संधी दिली आहे.” फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक कुडवाने स्मृतिभ्रंश काळजीसाठी निधी उभारला आहे. तसेच कॅन्सर सर्व्हायव्हर वेंकटरामन एस. यावर्षी कर्करोगावर काम करणाऱ्या एनजीओसाठी निधी उभारत आहेत.
ग्रीन बिब – ॲग्रो फॉरेस्ट इनिशिएटिव्ह यासारख्या उपक्रमांतून पर्यावरण आणि शाश्वततेसाठी योगदान दिले जात आहे. गेल्या वर्षी सोलापूरमध्ये ५०१६ झाडे लावली गेली होती आणि या वर्षी ३६ लाख रुपये आणण्याची अपेक्षा आहे. प्रोकॅम इंटरनॅशनलचे जॉइंट एमडी विवेक सिंग यांनी सांगितले की, “टाटा मुंबई मॅरेथॉनने भारतातील सर्वात समावेशक आणि प्रभावी परोपकारी व्यासपीठ तयार केले आहे. याच्या सामूहिक भावना आणि बदल घडवण्यासाठी एकत्र येण्याची क्षमता वाखाणण्यासारखी आहे.” या वर्षी १३००० हून अधिक धावपटू सामाजिक कारणांसाठी धावण्यासाठी तयार आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ एक साधा क्रीडा इव्हेंट न राहता, एक चळवळ बनली आहे जी सामूहिक कृतीद्वारे सामाजिक बदल घडवते.







