वृत्तसंस्था : भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup 2026) प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ज्यामुळे आजचा (१८ फेब्रुवारी) नामिबियाविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असा झाला आहे. एकेकाळी पाकिस्तान सुपर आठमध्ये प्रवेश करण्यासाठी चांगल्या स्थितीत दिसत होता. परंतु भारताविरुद्धच्या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. परिणाणी त्यांच्या शेवटच्या ‘अ’ गटातील सामन्यात त्यांना ‘करो या मरो’ अशा परिस्थितीत सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ चा सामना आज, १८ फेब्रुवारी रोजी एसएससी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. हा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. जर पाकिस्तानला २०२६ च्या टी-२० विश्वचषकात टिकून राहायचे असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत नामिबियाला हरवावे लागेल. जर नामिबियाने चुकून अपसेट केली तर पाकिस्तान या विश्वचषकातून बाहेर पडणार. नामिबियाचा एक खेळाडू आहे जो पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका आहे.






