मुंबई : मुंबई पोलिसांच्या कामगिरीची पोचपावती देणारी बातमी म्हणजेच परिमंडळ १० अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल २ कोटी ९० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल ४९० तक्रारदारांना परत करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हा हस्तांतरण कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ऑडिटोरियम हॉल, सेव्हन हिल हॉस्पिटल, मरोल-मरोशी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे पार पडला. परिमंडळ १० अंतर्गत अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.
चोरी, घरफोडी, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांमधील मालमत्ता परत देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. परत करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील – एकूण ४९० प्रकरणांमधील मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला. त्यामध्ये सोने-चांदी व हिरे दागिने – ३५१.५ ग्रॅम सोने, १३ किलो ७७० ग्रॅम चांदी व ०.६० कॅरेटचे २७ हिरे (एकूण किंमत सुमारे ₹.९९,०३,०००), रोख रक्कम – ₹.४२,७६,०००, दुचाकी वाहने – ९ (₹.४,९५,०००), तीनचाकी वाहने – ११ (₹.१०,२०,०००), चारचाकी वाहन – १ (₹.४,००,०००), मोबाईल फोन – ४४२ (₹.१,१६,००,०००), सायबर फसवणूक प्रकरणातील रक्कम – ₹.१२,५०,०००, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू – ₹.१,५०,०००, एकूण मुद्देमालाची किंमत – ₹.२,९०,९४,०००. दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचा मुद्देमाल परत मिळाल्याने ४९० तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी मुंबई पोलिसांच्या तत्पर कारवाईचे व पारदर्शक कामकाजाचे कौतुक करत आभार मानले. “मुंबई पोलीस नेहमीच कर्तव्यदक्षतेने काम करतात,” अशा शब्दांत नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच अंधेरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतराव पाटील, साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मौर्य आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, व.पो.नि. (अंधेरी), रविंद्र वाणी, व.पो.नि. (एम.आय.डी.सी.), सुधाकर हुंभे, व.पो.नि. (मेघवाडी), इक्बाल शिकलगार, व.पो.नि.(जोगेश्वरी), सुनिल यादव, व.पो.नि.(साकीनाका), जितेंद्र सिताराम सोनावणे, व.पो.नि.(पवई) व अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून जप्त केलेला मुद्देमाल अल्पावधीत तक्रारदारांना परत देणे ही मुंबई पोलिसांची जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी कारवाई ठरली आहे. परिमंडळ १० च्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
परत करण्यात आलेल्या मुद्देमाल
• सोने-चांदी व हिरे दागिने एकूण किंमत – ₹. ९९,०३,०००
• रोख रक्कम – ₹. ४२,७६,०००
• दुचाकी वाहने – ९ (₹. ४,९५,०००)
• तीनचाकी वाहने – ११ (₹. १०,२०,०००)
• चारचाकी वाहन – १ (₹. ४,००,०००)
• मोबाईल फोन – ४४२ (₹. १,१६,००,०००)
• सायबर फसवणूक प्रकरणातील रक्कम – ₹. १२,५०,०००
• इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू – ₹. १,५०,०००
• एकूण मुद्देमालाची किंमत – ₹. २,९०,९४,०००






